प्रा. शेषराव मोरे करतात ते ‘राक्षसीकरण’ आणि बशारत अहमद करतात ते ‘शुद्धीकरण’?
मोरे यांचे विश्लेषण चुकले असे चर्चेसाठी आपण गृहीत धरले तरी बशारत अहमद यांनी ‘मुस्लीम मनाचा शोध’ या ग्रंथातील ‘समारोप’ हे प्रकरण विचारपूर्वक अभ्यासायला हवे होते. तपशील, भाष्य, संदर्भ चुकू शकतात, पण ‘समारोप’ प्रकरणाच्या आधीची साडेसहाशे पानं लिहिण्याचा आटापिटा मोरे का करत आहेत, ते त्या समारोप प्रकरणात स्पष्ट झालेलं आहे. त्याचा पुसटसा उल्लेखही अहमद यांनी करू नये याचं आश्चर्य वाटतं!.......